Chanakya Niti Women are automatically drawn to such men Special things said by Chanakya

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Chanakya Niti: आचार्य चाणक्य यांची नीतिशास्त्राची तत्त्वं जगात सर्वात समर्पक आहेत. जर कोणी चाणक्याच्या नीती आत्मसात केली तर तो एक चांगला माणूस बनू शकतो. शिवाय अशा व्यक्तींच्या जीवनात सर्व सुख येणार आहे. चाणक्याने ( Chanakya Niti ) आपल्या नीतिशास्त्रात धर्म, अर्थ, काम, मोक्ष, कुटुंब, नातेसंबंध, प्रतिष्ठा, समाज, नातेसंबंध, देश आणि जगासह इतर अनेक गोष्टींचा उल्लेख केलाय

चाणक्यांनी त्यांच्या ग्रंथामध्ये पती-पत्नी आणि स्त्री-पुरुष यांच्यातील नातेसंबंधात अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणं गरजेचं आहे. यावेळी तुमचं जीवन आणि नातेसंबंध सुधारू शकता.

चाणक्याची ( Chanakya Niti ) धोरणं माणसाला प्रत्येक कठीण प्रसंगातून आणि प्रत्येक टप्प्यावर बाहेर काढण्यासाठी पुरेशी आहेत. आचार्य चाणक्य यांनीही स्त्री-पुरुष संबंधांवर मत मांडली आहेत. महिला त्यांच्या जोडीदाराबद्दल कसे विचार करतात. चाणक्यांच्या म्हणण्यानुसार, जो पुरुष इमानदार आहे, त्याची वागणूक चांगली आहे, अशा पुरुषांकडे स्त्रिया आकर्षित होतात.

इमानदार व्यक्ती

चाणक्यांच्या नितीनुसार, जर पुरुष इमानदार असेल आणि त्याचं चारित्र्य चांगलं असेल तर अशा पुरुषांबद्दल स्त्रियांचे आकर्षण वाढतं. ज्याचं चारित्र्य स्वच्छ असतं, तो इतर स्त्रियांकडे पाहत नाही किंवा त्याचे कोणतंही अवैध संबंध नसतात, त्यांच्याकडे स्त्रिया आकर्षित होतात. 

श्रीमंत व्यक्ती

ज्याच्याकडे पैसा आहे आणि तो गडगंज संपत्तीचा मालक आहे तो कोणालाही सर्वोत्तम जीवन देऊ शकतो त्यांच्याकडे स्त्रिया आकर्षित होतात. अशा स्थितीत आचार्य चाणक्य सांगतात की, महिलांना अशा पुरुषांना आपला जीवनसाथी बनवायचे असतं आणि त्यांच्याकडे आकर्षित होतात.

एक चांगला श्रोता 

स्त्रिया नेहमीच अशा पुरुषांकडे आकर्षित होतात जे त्यांचं बोलणे लक्षपूर्वक ऐकतात. महिलांना आपल्या गोष्टी ऐकणारे पुरुष आवडतात. त्यामुळे स्त्रियांचे आकर्षण त्या पुरुषांकडे जास्त असते जे चांगले ऐकणारे असतात.

( Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

Related posts